योग ही गेली हजारो वर्षा पासून मानवाला त्याच्या आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, व नैतिक व्यवहारातील योग्य मार्ग दाखवणारी एक विद्या आहे. या योगसाधने विषयीची सूत्रबद्ध मांडणी करणारा पहिलाच ग्रंथ म्हणजे ऋषि पतंजलीचा योगसूत्र होय.
ऋषि पतंजली यांनी योगविषयाचे ज्ञान माहिती व त्याचे सामर्थ्य एकूण १९५ सूत्रात लिहिले आहे. जीवात्मा व परमात्मा यांचा एकात्मतेने मानवाने मोक्षप्राप्ती कसे जावे हेच या सूत्रात विषाद केले आहे.
हजारो अध्यात्मिक उन्नतीचा प्रभावी मार्ग म्हणून योगाचा अभ्यास केला जातो पण त्याचे अंतिम लक्ष्य काय आहे ? तर मोक्षप्राप्ती जाणे. परंतु योग या शब्दाची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्यात योगज्ञान, कर्मयोग, भक्तियोग, मंत्रयोग, तंत्रयोग, लययोग व महर्षि पतंजलीचा अष्टांगयोग यांचाही अंतर्भाव होतो.
हठ योगाचे उदाहरण घेताना असे लक्षात येते की, या साधनेचे अंतिम लक्ष्य जरी आध्यात्मिक असले तरी त्याचबरोबर आरोग्य, स्थैर्य, अंग लाघव, प्रसन्नता, आरोगता, मनोकामिक सुधृधता, स्पष्ट वाणी, निर्दोष दृष्टी, नाडी शुद्धि, प्रज्वलित जठराग्नि, मनोदेहिक सुचिता, स्थिर चित्त हे सर्व आपोआपच प्राप्त होते.
म्हणूनच महर्षि पातंजली यांनी त्यांच्या पातंजल योगसूत्रे हा योगशास्त्रावरील एक महत्वाचा ग्रंथ मानला जातो. आजही योगविद्या ही शूढविद्या समजली जाते.